विकास कामांचा तपशील

मी सौ.पूजा रणजित मोरे मौजे व्हन्नूर ता.कागल या गावची सरपंच म्हणून कार्यरत असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मा.नामदार हसन मुश्रीफ साहेब (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री (कोल्हापूर जिल्हा) यांच्या सहकार्यातून व्हन्नूर गावाकरीता १५ कोटीहुन अधिक निधी प्राप्त झाला आहे. माझ्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये गावातील झालेली प्रमुख विकास कामे व राबविलेले विविध उपक्रम यांचा आढावा खालील प्रमाणे देत आहे.

क्र.उपक्रमतपशील
महिला व बाल विकासग्रामपंचायतने महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये बालसभा, महिलासभा, बाल मार्गदर्शन, पोषण आहार, स्वयं‌सहाय्यता गट, कौशल्य विकास आणि विधवा प्रथा बंद यांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधाग्रामपंचायतने गावाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये अंतर्गत रस्ते, गटर्स, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, सांस्कृतिक हॉल, साकव पूल, मंदिरे, रमाई आवास, गोबरगॅस आणि शौचालय बांधकाम यांचा समावेश आहे.
आरोग्य व स्वच्छताग्रामपंचायतने गावातील आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये सामान्य आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, डोळे तपासणी, कोविड लसीकरण, मेडिक्लोअर वाटप, ओ.टी.टेस्ट, पाणी तपासणी, औषध फवारणी, कचरा व्यवस्थापन आणि शोषखड्डे खोदणे यांचा समावेश आहे.
जल व वीज व्यवस्थापनग्रामपंचायतने गावातील जल आणि वीज व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये जलजीवन मिशन, जलशुद्धीकरण केंद्र, सोलर पथदिवे, दिवाबत्ती आणि हायमास्ट दिवे लावणे यांचा समावेश आहे.
शैक्षणिक सुविधाग्रामपंचायतने गावातील शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये बोलक्या भिंती, ई-शाळा, टॅबलेट वाटप, ऑफलाइन प्रोजेक्ट रूम, संगणक खोली, संस्कार वर्ग, सौरऊर्जा प्रणाली, किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण, वृक्षारोपण, अंगणवाडी सुधारणा यांचा समावेश आहे.
पर्यावरण संवर्धनग्रामपंचायतने गावातील पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये वृक्ष लागवड आणि निर्माल्यदान यांचा समावेश आहे.
कृषी तंत्रज्ञानग्रामपंचायतने गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यासाठी ग्रामपंचायतने अभ्यास दौरे, शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिक आणि ठिबक सिंचन योजनेसाठी सहकार्य केले आहे.
ग्रामरक्षणग्रामपंचायतने गावातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये मुला-मुलींना स्वयंरक्षणासाठी कराटे आणि जुडोचे प्रशिक्षण देणे आणि गावातील शाळेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे यांचा समावेश आहे.
क्रीडा व संस्कृतीग्रामपंचायतने गावातील मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये खेळासाठी साहित्य वाटप, ओपन जिम, शाहिरी, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन यांचा समावेश आहे.
१०लोकसहभागग्रामपंचायतने गावातील लोकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. यासाठी ग्रामपंचायतने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, योजना महोत्सव, महिला कार्यक्रम, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, करिअर मार्गदर्शन मेळावा, गडकिल्ले भ्रमंती, एन.एस.एस. कॅम्प आणि जीवन विद्या मिशन अंतर्गत घरोघरी विश्वप्रार्थना करण्यात आली आहे.

वरील सर्व विकासकामे व विविध उपक्रम ग्रामपंचायतील सहकारी, ग्रामस्थ, अधिकारी वर्ग यांच्या सहकार्य व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे गावाला विकासाची नवी दिशा मिळाली आहे.

Scroll to Top